8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट, लोकसभा निवडणुकीपूर्वी पगारात होणार बंपर वाढ
केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन करणार नसल्याची चर्चा होती, मात्र आता सरकारच्या मूडमध्ये बदल झाल्याच्या बातम्या येत आहेत.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकार वेळोवेळी नवनवीन अपडेट देत असते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
कारण केंद्र सरकार 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन करणार नसल्याची चर्चा होती, मात्र आता सरकार यामध्ये बदल करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना चांगली बातमी देण्याचा विचार करत आहे.
किमान पगारात मोठी वाढ होऊ शकते?
कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नाही तर 8 व्या वेतन आयोगाची फाईलही तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा स्थितीत सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनातही मोठी वाढ होऊ शकते.
2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत
पूर्वी सुरू असलेल्या चर्चेच्या आधारे आठवा वेतन आयोग येणार नाही, अशी अपेक्षा होती. पण, आता सातव्या वेतन आयोगानंतर पुढील वेतन आयोग आणण्याची तयारी सुरू आहे. या सर्व प्रकाराबाबत शासनाकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणूक जवळ आलेल्या आहेत. या निवडणूक 2024 मध्ये होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकार कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेईल का हे समजणार आहे.
निवडणुकीपूर्वी घोषणा होऊ शकते
पुढील वेतन आयोगाची घोषणा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केली जाऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय होणार आणि काय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांवर असेल. त्यांच्या देखरेखीखालीच समिती स्थापन केली जाईल.
दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार हे निश्चित आहे. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. तसेच सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार कधी आनंदाची बातमी देणार आहे हे पाहावे लागेल.