ताज्या बातम्या

मारहाण करून सियाज कार लांबविली अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

बार्शी येथून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे भाडे घेऊन आलेल्या चारचाकी वाहन चालकाला तिघां भामट्यांनी मारहाण केली.

तसेच त्याच्या ताब्यातील सियाज कंपनीची चारचाकी व एक हजार रू. रोख असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन ते भामटे पसार झाल्याची घटना २६ जून रोजी मध्यरात्री घडली.

राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी संतोषकुमार लोढा यांचे व्याही अतुल माणिकचंद राठोड हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे एम एच १३ बी एन ६३५५ क्रमांकाची सियाज कंपनीची चारचाकी कार आहे.

त्या गाडीवर नवाब मोहम्मद पठाण राहणार बार्शी हा चालक म्हणून काम करतो. दिनांक २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान बार्शी बस स्थानक परिसरात तिघेजण राहुरीकडे येण्यासाठी वाहन शोधत होते.

त्यावेळी त्यांनी तेथील एका रिक्षा चालकाला चौकशी केली. त्या रिक्षा चालकाने नवाब पठाण याला बोलावून घेतले. राहुरी येथून एका महिला पेशंटला घेऊन यायचे असे सांगून त्यांनी ११ रू. किलो मीटर प्रमाणे नवाब पठाण याच्या ताब्यातील सियाज गाडी भाडोत्री घेतली.

सायंकाळी तेथून निघाल्यावर रात्री बारा वाजे दरम्यान ते राहुरी येथे आले. सदर भामट्यांनी चालकाला गाडी मल्हारवाडी रोडकडे घेण्यास सांगितले.

दरम्यान घोरपडवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात गेल्यावर त्या तिघा भामट्यांनी नवाब पठाण या चालकाला मारहाण करून त्याला रूमाल व चार्जरच्या केबलने झाडाला बांधून ठेवले. त्याच्या जवळील एक हजार रू. रोख व गाडी असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले.

चालक नवाब याने कशीबशी स्वतःची सुटका करून जवळच असलेल्या एका वस्तीवर गेला. आणि बार्शी येथील त्याच्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली. त्याने गाडी मालक अतुल माणिकचंद राठोड यांना सांगितले.

अतुल राठोड यांनी त्यांचे राहुरी येथील व्याही संतोषकुमार लोढा यांना खबर केली. संतोषकुमार लोढा व अतुल राठोड यांनी चालक नवाब याला घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button