अहमदनगर ब्रेकिंग : ड्रायव्हरची चुकी ! कार खड्ड्यात गेली, आणि अपघातात दिड महिन्याचं बालक ठार !

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मानमोडी इथे ईरटीगा गाडीवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दीड महिन्यांचे बालक ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.
जखमींची नावे –
अंकुश बाबुराव अडळकर (45), सिताबाई अंकुश अडळकर(42), गंगुबाई भुजंगराव देखमुख (75), गंगुबाई बाबुराव अडळकर (70), पल्लवी नवनाथ देशमुख (14), रुपाली बालाजी देशमुख (26) हे या अपघातात जखमी झाली आहे. हे सर्व जखमी पुणे जिल्ह्यातले आहे.
कसा झाला अपघात ?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डीतूननिर्मल- कल्याण (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाने जाणारी ईरटीगा कार ही नगरच्या दिशेने जात असताना मानमोडी येथील धोकादायक वळणावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.
उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच रस्त्याहून जाणार्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातात एक दिड महिन्याचा मुलगा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखम झाले आहे.
गंभीर जखमी झालेल्या दीड महिन्याच्या बालकावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्या बालकाचा मृत्यू झाला आहे.
सावधगिरीचे फलक लावणे अत्यंत आवश्यक
अपघाताच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे.मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम सुरु आहे असे सावधानगिरीचे फलक लावण्यात आले नाही.
त्यामुळे या रस्त्यावरून भरधाव वेगाने येणार्या गाड्यांना अचानकपणे पुढे पुलाचे काम सुरू आहे असे लक्षात येऊन चालकाचा गोंधळ उडतो.
त्यादरम्यान अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी सावधगिरीचे फलक लावणे अत्यंत आवश्यक असल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे.