Maharashtra Havaman Andaj : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग ! मुंबई, पुण्यासह अनेक भागात अजूनही जोर वाढण्याची शक्यता; जाणून घ्या IMD चा इशारा
राज्यात अनेक भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही या पाऊसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Havaman Andaj : देशभरात सध्या जोरदार मान्सून बरसत आहे. मुंबईसह अनेक भाग सध्या जलमय झाले आहेत. मात्र अजूनही पाऊसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कारण हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे येथे पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
प्रादेशिक हवामान केंद्र
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या सूचनेनुसार, पुढील पाच दिवस मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, काल रात्री यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अनेक सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे आयटीओ रस्त्यावर पाणी साचल्याने दैनंदिन प्रवाशांची अडचण होत आहे.
केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार, काल रात्री 10 वाजता यमुना नदीची पाणी पातळी 208 पॉइंट शून्य दोन मीटर होती. हवामान खात्याने आज दिल्लीसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच हिमाचल प्रदेश गेल्या आठवड्यापासून ढगफुटी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसातून सावरण्यासाठी अजूनही धडपडत आहे. हिमाचलमध्ये 18 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे IMD ने म्हटले आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचसोबत उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते आणि वाहतूक प्रभावित झाली आहे. डेहराडूनमध्ये आजही पाऊस पडेल. हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या उत्तर भागात आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील पावसाचा परिणाम दिल्लीतही दिसून येईल.
तथापि, सध्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला नाही. या राज्यांमध्ये अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही.
तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरात, केरळ, लक्षद्वीप, पूर्व राजस्थान आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ईशान्य भारत, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.