ताज्या बातम्या

Maharashtra Mansoon Alert : राज्यात धो-धो पाऊस कधी बरसणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज जाणून घ्या

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून वेळेवर मुंबईत पोहोचू शकणार नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावेळी मान्सून किमान 10 दिवसांच्या विलंबाने दाखल होईल.

Advertisement

Maharashtra Mansoon Alert : पाऊसाचे दिवस सुरु झाले आहेत. मात्र अजूनही राज्यात पाऊसाने पाठ फिरवली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पाऊस होईल असे सांगण्यात येत आहे, मात्र अजूनही पाऊसाने हजेरी लावली नाही.

पाऊस न पडल्यामुळे राज्यातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कारण पेरणी करण्याच्या तयारीत असणारा शेतकरी मात्र पावसाच्या आगमनासाठी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

मात्र हवामान खात्याने सांगितल्यानुसार बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून वेळेवर मुंबईत पोहोचू शकणार नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावेळी मान्सून किमान 10 दिवसांच्या विलंबाने दाखल होईल. म्हणजेच मान्सून पुढील आठवड्यात मुंबईत दाखल होऊ शकतो.

Advertisement

वातावरणात पुरेसा ओलावा नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून 10 दिवस उशिराने मुंबईत दाखल होऊ शकतो. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हलका पाऊस पडत होता. बिपरजॉय चक्रीवादळामुळे काही प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली होती, परंतु आता ही आर्द्रता कमी होत आहे.

त्यामुळे दक्षिण-पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत कोणताही बदल न झाल्याने मुंबईत मान्सूनने उदासीनता दाखवली असून, आत्ता तरी पाऊस पडेल असे सांगता येत नाही. त्यामुळे येत्या आठवडाभरात मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी 11 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. या दृष्टिकोनातून मान्सून मुंबईत 10 दिवसांच्या विलंबाने दाखल होणार आहे. हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांच्या म्हणण्यानुसार हवेत ओलावा नसल्यामुळे यंदा 18 ते 21 जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत हवामान मान्सूनसाठी तयार होईल.

Advertisement

मुंबईत मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन 2021 मध्ये मान्सून 9 जून रोजी मुंबईत दाखल झाला. त्याचप्रमाणे 2020 मध्ये मुंबईला 14 जून रोजी मान्सूनने तडाखा दिला होता, तर 2019 मध्ये 25 जून रोजी मुंबईत मान्सून दाखल झाला होता.

2018 मध्येही येथे 9 जून रोजी मान्सून दाखल झाला होता. यंदा 11 जून रोजी मान्सून कोकणमार्गे मुंबईत दाखल झाला असला तरी चक्रीवादळामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम मुंबईत उशिरा मान्सूनच्या रूपाने दिसून येत आहे. पावसाची प्रदीर्घ प्रतीक्षा असल्याने उष्मा आणि आर्द्रतेमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे.

गेल्या 5 वर्षात मान्सून कधी दाखल झाला होता?

Advertisement

वर्षाची तारीख

2022 – 11 जून
2021 – 9 जून
2020 – 14 जून
2019 – 25 जून
2018 – 9 जून

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button