आर्थिक

Onion Price Hike : जगात कांदा उत्पादनात आघाडीवर भारत, तरीही देशातच कांद्याच्या किंमती झपाट्याने का वाढतात? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे…

देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांद्याचे उत्पादन घेत असतात. मात्र कंदाचे बाजार कधी खूप ढासळतात, तर कधी खूप वाढतात. ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

Onion Price Hike : देशातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा कांद्याचे उत्पादन घेत आहे. मात्र काही दिवसांपासून कांद्याचे बाजार हे खूप कमी आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचे गोडाऊन तयार केले आहेत.

मात्र आता सरकारकडून चांगले संकेत येण्यास सुरुवात झाली आहे. कारण कांद्याची देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, कांद्याच्या निर्यातीवर पहिल्यांदाच शुल्क आकारण्यात आले आहे. देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव वाढू लागले आहेत.

अर्थ मंत्रालयाने सीमाशुल्क अधिसूचनेद्वारे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. मात्र असे असताना सर्वाधिक कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या देशातच कांद्याचे बाजार वाढत नाहीत.

याबाबत रोहित कुमार सिंग यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी विशेषत: आगामी सणासुदीच्या काळात सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अलीकडच्या काळात कांद्याच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे.

कांद्याच्या किमती नियंत्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न

कांद्याच्या निर्यातीला आळा घालण्यासाठी सरकारने नेहमीच किमान निर्यात मूल्याचे साधन वापरले होते. मात्र, या वर्षी प्रथमच जावक मालावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ठेवलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 30.72 रुपये प्रति किलो होती, तसेच कमाल किंमत 63 रुपये प्रति किलो आणि किमान 10 रुपये प्रति किलो होती.

अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्याने वार्षिक किरकोळ किंवा ग्राहक किंमत महागाई जुलैमध्ये 7.44 टक्क्यांच्या 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. सरकारने यंदा तीन लाख टन कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे. त्याची गेल्या आठवड्यापासून घाऊक बाजारात प्रमुख ठिकाणी विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे.

बफर झोनच्या कांद्याची विक्री होत आहे

रोहित कुमार सिंह म्हणाले की, आतापर्यंत 2,000 टन बफर झोन कांद्याची दिल्ली, आसाम, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील घाऊक मंडईंमध्ये विक्री झाली आहे.

कांदा उत्पादनात भारत आघाडीवर आहे

कांदा उत्पादनात भारत जगात अव्वल आहे. 2021 मध्ये भारतात 26.6 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले. 24.2 लाख मेट्रिक टनांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, इजिप्त तिसऱ्या क्रमांकावर होता, ज्याने 2021 मध्ये 3.3 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन केले.

महाराष्ट्रात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. सरकार, APEDA आणि FAO च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये, भारतातील कांद्याच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 43 टक्के होता. मध्य प्रदेशात 16 टक्के, कर्नाटकात 9 टक्के आणि गुजरातमध्ये 9 टक्के होते.

कांद्याची निर्यात

यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत सुमारे 8.2 लाख टन कांद्याची निर्यात अपवादात्मकरीत्या उच्च झाली आहे. मागील याच कालावधीत ते 3.8 लाख टन होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे खरीप पेरणी मंदावल्याच्या वृत्तामुळे किरकोळ कांद्याचे दर महिन्यापूर्वी 25 रुपयांवरून 30 रुपये किलो झाले आहेत, असे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे साठवलेल्या रब्बी पिकांमध्ये जास्त आर्द्रतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button