अपघातग्रस्त वाहनांबाबत एसपींनी घेतला ‘हा’ निर्णय

अपघात झाल्यानंतर अपघातस्थळावरून पोलिसांनी विनाकारक वाहन ठाण्यात आणून ठेवले किंवा ठेवत असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.
अधीक्षक पाटील म्हणाले, अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात विनाकारण आणू ठेवण्याची कोणती गरज नाही. अपघातानंतर ज्या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना तपासणी करणे आवश्यक आहे.
सुरक्षितेच्या कारणास्तव वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणणे आवश्यक आहे. तेवढेच अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणले पाहिजे.
किरकोळ अपघातातील वाहने पंचनामा झाल्यानंतर तात्काळ मालकांना दिली जाणार आहेत. जे अपघातग्रस्त वाहनाचे मालक वाहन घेऊन जाणार नाहीत, त्यांना प्रती तास 50 रूपये दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे.
वाहन मालकांनी वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले आहे.