अहमदनगरताज्या बातम्याराहुरी

राहुरीत चाललंय काय? आठ दिवसात सहा अल्पवयीन मुली पळविण्याचे घटना घडल्या

Ahmednagar News : काही दिवसांपासून राहुरी तालुक्यासह शहरात अल्पवयीन मुली पळवून नेण्याचे तसेच प्रेम प्रकरणातून पळून जाण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली.

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून मुली पळवून नेणे किंवा पळून जाण्याच्या सहा घटना समोर आल्या आहे. या घटनांमुळे पालक वर्गातून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहुरी शहर हद्दीत पुन्हा एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडकौोस आली. राहुरी शहर हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहत आहे.

गुरुवारी (दि.४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ती मुलगी व तिच्या घरातील लोक जेवण करुन झोपले होते. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्या मुलीचे वडील लघुशंकेसाठी उठले असता, ती मुलगी घरातून गायब झाल्याचे दिसून आले. मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही.

त्या मुलीला कोणीतरी अज्ञात तरूणाने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेले असावे, अशी माझी खात्री झाल्यानंतर तीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात तरूणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्‍यातील सोनगाव, गुहा, केंदळ, टाकळीमियाँ, वळण तसेच राहुरी शहर या भागात मुलींना पळवून नेल्याच्या आणि पळून जाण्याच्या सहा घटना उघडकीस आल्या आहेत.

या घटनामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्‍त करण्यात येत आहे. या घटनांमध्ये अल्पवयीन पासून ४२ वर्षीय महिलांचा समावेश आहे. ही बाब चिंताजनक असून या घटनांना जबाबदार कोण याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button